Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
मुलींना पाळी का येते?
मासिक पाळी चक्रावर तुमची पाळी येणे अवलंबून असते. त्यामुळे हे चक्र समजावून घेणे गरजेचे आहे. बाळाला जन्म देणे हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. बाळाच्या संरक्षणासाठी शरीरात अनेक स्तर विकसित होत असतात. गरोदर राहण्यासाठी मासिक पाळी दर महिन्याला स्रीच्या शरीराला तयार करीत असते. साधारणपणे मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असून त्यात तीन टप्पे असतात.
मासिक पाळी - गर्भाशयाचे चिन्ह
पहिला टप्पा : हा असा टप्पा आहे जेथे रक्तस्राव होतो. साधारणतः हा कालावधी पाच ते सात दिवस असतो. या कालावधीत एंडोमेट्रिअल अस्तराची शेडिंग (बाळाचे संरक्षण करणाचे कवच) तयार केली जाते.
मासिक पाळी - गर्भाशयाचे चिन्ह
दुसरा टप्पा : हा तो काळ आहे ज्या दरम्यान संरक्षणात्मक गर्भाशय अस्तर तयार होते. ते साधारण सात दिवस टिकते.
मासिक पाळी - गर्भाशयाचे चिन्ह
तिसरा टप्पा : या काळात आपले गर्भाशय गर्भधारणा होण्याची प्रतीक्षा करते. जर गर्भधारणा झाली नाही तर संरक्षक अस्तर कमी होऊ लागते. शेवटी त्याचे शेडिंग होऊ लागते जेव्हा मासिक पाळीचे नवीन चक्र तयार होते.
तर थोडक्यात सांगायचे झाले तर, आपले शरीर दर महिन्याला गर्भधारणेची तयारी करते. आपल्या गर्भाशयाचे अस्तर बाळाच्या पालनपोषणाची आणि संरक्षणाची तयारी करण्यासाठी जाड होते. जेव्हा मासिक पाळी चक्रादरम्यान गर्भधारणा होत नाही तेव्हा आपल्या शरीराद्वारे तयार केलेले संरक्षक अस्तर दर महिन्याला मोकळे होते यालाच आपण मासिक पाळी म्हणतो. ही प्रक्रिया नवीन संरक्षणात्मक अस्तरासाठी मार्ग बनवते आणि आपण गर्भवती झाल्यास आपल्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी तयार राहते. आयुष्यात ठराविक वेळी गर्भधारणा होऊ शकते. परंतु, आपल्या शरीराला हे माहीत नसते. त्यामुळे यासाठी शरीर दर महिन्याला तुम्हाला तयार करते. दर महिन्याला तुम्ही ज्या त्रासातून जाता तोच त्रास तुम्हाला ‘आई’ होण्याचा अंतिम आनंद देत असतो.
--------------------------- | --------------------------- |