मासिक पाळी म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. दर महिन्याला येणारी पाळी हि काही स्त्रियांसाठी वेदनारहित असते तर काहींसाठी अति वेदनादायी असते. सामान्यतः मासिक पाळीच्या दरम्यान मुलींचे पोट, कंबर आणि पाय अतिशय दुखतात. काही जणींना तर चक्कर व भोवळ सुद्धा येते. तर अनेक स्त्रियांना लूज मोशनची समस्या देखील सतावते. हे सगळे बदल मासिक पाळीमुळेच शरीरात होत असतात. या काळात प्रत्येक मुलीने स्वत:ची काळजी घेणे क्रमप्राप्त असते, पण बऱ्याचदा असे होते की मासिक पाळीबद्दल योग्य ज्ञान नसल्याने मुली या काळात चुकीच्या समजातून गोष्टी करतात आणि स्थिती अधिक खालावते. बऱ्याच जणी यावर उपचार असूनही उपचार घेत नाहीत कारण त्यांना भीती असते कि याचा भविष्यात वाईट परिणाम व्हायला नको आणि त्या तश्याच त्या वेदना सहन करत राहतात. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीशी निगडित अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या सहसा मुलींना माहित नसतात. चला तर जाणून घेऊया.
या गोष्टींमुळे वाढतात वेदना
मासिक पाळीमध्ये कोणत्या प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतात हे फक्त एक मुलगीच समजू शकते. हि वेदना इतकी असह्य असते कि अक्षरशः जीव जातोय कि काय असा भास होतो. अशा स्थितीमध्ये मुलीला मासिक पाळी दरम्यानच्या आहाराबद्दल काही गोष्टी माहित असायला हव्यात जेणेकरून या वेदनांपासून ती मुक्ती मिळवू शकते. मासिक पाळी असताना खारट पदार्थ खाऊ नयेत आणि खारट फळांपासून तर पूर्णपणे लांब राहावे. संत्री, मोसंबी, अननस आणि टोमेटो या फळांचे सेवन करू नये. कारण यांच्यात सायट्रिक अॅसिड असतं जे शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं. मासिक पाळी दरम्यान मात्र हे अॅसिड वेदना वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं.
ह्या दोन गोष्टींपासून दूर राहा
मासिक पाळीदरम्यान न खाण्यासारखे पदार्थ खूप आहेत पण त्यातल्या त्यात दोन असे पदार्थ आहे ज्यांपासून मुलींनी आवर्जून दूर राहावे. ते दोन पदार्थ म्हणजे केळी आणि दही! मासिक पाळी दरम्यान केळी आणि दही अजिबातच खाऊ नयेत. यांचे सेवन केल्याने काही मिनिटांतच पोटात वेदना सुरु होतात आणि क्रॅम्प्सची समस्या सुद्धा उदभवू शकते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान केळी आणि दही खायचे नाहीत हि गोष्ट कधीच विसरू नका आणि ज्यांना माहित नाही त्यांनाही सांगा.
काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी वेदनादायक का असते?