मातृत्व हे पूज्य असते; परंतु विवाहपूर्वीचे मातृत्व हे कलंकित असते. असे मूलही अनौरस म्हणून ओळखले जाते. फक्त संभोगामुळेच गर्भधारणा होते. विवाहापूर्वी पुरुषाने कितीही गळ घातली तरी स्त्रीने संभोगाला प्रवृत्त होऊ नये. ‘नाही’असे ठासून सांगावे. चूक घडलीच तर पाळी येते की नाही ते पाहावे. पाळी चुकली तर गर्भारपणाची शंका घ्यावी. लघवीची ‘प्रेग्नसी टेस्ट’करावी. ती होकारात्मक आल्यास आईला कळवावे. गर्भपात करणे याशिवाय इलाज नसतो.
आता कायद्याने गर्भपाताला परवानगी दिली आहे. तरीही अशी चूक होणार नाही यासाठी सावध असावे. तसेच ‘झाले गेले गंगेला मिळाले’ही वृत्ती हवी. अपराधाची किंवा पापाची भावना उराशी बाळगून जगू नये. जीवनाचे नवे कोरे पान सुरू करावे. अखेर चूक होणे हा मनुष्यधर्म असतो; कारण चूक ही जाणूनबुजून केलेली नसते. गर्भारपणास कारणीभूत असणाऱ्या पुरुषाशीच लग्न केल्यास असे लग्न सहसा यशस्वी होत नाही, असे आढळून येते.
विवाहापूर्वी गर्भधारणा झाली तर मुलीने काय करावे?