Google AdSense Header Slot

स्त्री बीज फुटण्याची लक्षणे?

Language: Marathi | Published: 09 Jul 2021 | Views: 17
स्त्री बीज फुटण्याची लक्षणे?
गर्भधारणा आणि स्त्री आरोग्य- भाग १
No-Author | महाराष्ट्र टाइम्सUpdated: 13 Dec 2018, 9:09 am
Subscribe
गर्भधारणा होण्यासाठी चार गोष्टींची गरज असते. त्यामध्ये ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज या चार गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊ.
pregnancy
डॉ. ज्योती जयेश रहाळकर, स्त्री रोग तज्ज्ञ

कपिवा अकादमी ऑफ आयुर्वेदाने सांगितलं गुपित; 10 पैकी 8 लोकांनी नैसर्गिक पद्धतीने कमी केला डायबिटिज

गर्भधारणा होण्यासाठी चार गोष्टींची गरज असते. त्यामध्ये ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज या चार गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊ.

ऋतू म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे जमिन किंवा योग्य जागा, अंबु म्हणजे जलतत्व, ओलावा जो पोषणासाठी गरजेचा असतो आणि बीज म्हणजे स्त्री आणि पुरुष बीजे. या चार गोष्टींच्या व्यतिरिक्त आयुर्वेद शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा पाचवा घटक सांगितलेला आहे आणि तो म्हणजे दैव. वरील चारही भाव पूर्णावस्थेत असले, तरी दैव किंवा योग उत्तम नसेल, तर गर्भधारणा होऊ शकत नाही. स्त्री ही वयाच्या अठराव्या वर्षापासून तर पुरुष हा वयाच्या एकविसाव्या वर्षापासून गर्भधारणेसाठी शारीरिक आणि मानसिक पातळीवर योग्य समजले जातात. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे वय बऱ्यापैकी पुढे सरकलेले आहे. शिक्षण संपवून स्थैर्य आल्यावर लग्नगाठ बांधून घेणारे तरुण-तरुणी आता सहजगत्या वयाची पंचवीस किंवा तीस वर्षे पार करत आहेत. त्यापूर्वीच्या आयुष्यामध्ये पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव म्हणून असेल वा जागतिकीकरणामुळे असेल; पण स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष न देता प्रकृतीच्या तक्रारींचा आलेख वाढतच जातो आहे. डाएटच्या नवाखाली काही कुपोषित राहतात; तर आहार-विहार-व्यायाम-विश्रांतीच्या असमतोलाने काही जणांमध्ये गर्भधारणेच्या दृष्टीनी असंख्य अडचणी येतात.


पॉलिसिस्टिक ओव्हरीज, अनियमित पाळी; तसेच स्थौल्य, तरुणपणीच अतिताणामुळे मागे लागणारे उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आणि यासारख्या इतरही अंतस्रावी ग्रंथींच्या अनियमिततेने येणारे आजार या सर्वांचा विचार करता गर्भधारणा क्लिष्ट होऊ शकते.

आजकाल समानतेच्या नावाखाली मुलांबरोबरच मुलीदेखील धूम्रपान, मद्यपान अगदी मोकळेपणाने करतात. हुक्का आणि तत्सम इतर काही नशासुद्धा आता सर्रास केल्या जातात. बाळाची अपेक्षा ठेवणाऱ्या मुलींना वेळीच त्यातून निवृत्ती घेणे हिताचे ठरते. गर्भधारणेत बाधा येत असेल, तर त्यासाठी अनेक आधुनिक उपचारपद्धती आणि मार्ग उपलब्ध आहेत. ज्यायोगे प्रत्येक जोडप्याला आई-बाबा होणे शक्य झाले आहे. एकदा का गर्भधारणा झाली, की घरातले वातावरणच बदलून जाते. ती गोड बातमी घरामध्ये आनंदाचे सूर घेऊन पसरू लागते.

निष्ठीविका गौरवमंगसाद तंद्रा प्रहर्षे हृदये व्यथा च
तृप्तिश्च बीजग्रहणं च योन्यां गर्भस्य सद्योनुगतस्य लिंगम्||

शुक्र आणि आर्तव म्हणजे पुरुष आणि स्त्री बीज यांचा संयोग झाल्यास गर्भिणीमध्ये जी लक्षणे उत्पन्न होतात, त्यांना सद्योगृहित गर्भलक्षणे म्हणतात. ज्यामध्ये तोंडाला पाणी सुटणे, थकवा, गळून गेल्यासारखे वाटणे, तंद्रा, अंगावर शहारे येणे, अंग जड होणे, छातीत धडधडणे, योनीमध्ये स्फुरण जाणवणे, मांड्या गळून जाणे अशी लक्षणे जाणवतात. या नंतर पुन्हा पाळी येत नाही आणि स्त्रीकडून शुक्राचे ग्रहणही होत नाही.


सुरुवातीला सगळ्या तपासण्या झाल्यावर बाळाच्या उत्तम वाढीसाठी औषध योजना चालू होते. जो तो आपापल्या परीने त्या आई होऊ घातलेल्या स्त्रीला अनेकविध सूचना द्यायला लागतो. भराभरा चालू नको, वेडीवाकडी उठू बसू नकोस, इथपासून ते रोज किमान अर्धा लिटर दूध प्यायलाच हवे इथपर्यंत. सासर-माहेरचा समतोल सांभाळणारी ‘ती’ अजूनच गांगरून जाते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp