Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
Water intake for Toddlers : लहान मुलांनी कोणत्या वयात किती पाणी प्यावं? जाणून घ्या इत्यंभूत माहिती!
बाळ जन्माला आलं की त्याला खूप जपावं लागतं. त्याला काय हवं नको ते सगळं पाहावं लागतं. २४ तास त्याची काळजी घ्यावी लागते. या वयात त्याच्या शरीराला उर्जेची खूप गरज असते आणि त्यामुळे त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. या आहारात पाणी हे महत्त्वपूर्ण योगदान देणारा घटक असतं. ज्या बाळाच्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी टिकून राहतं ते बाळ नेहमी सुदृढ राहते.
water feeding tips for child in marathi
Water intake for Toddlers : लहान मुलांनी कोणत्या वयात किती पाणी प्यावं? जाणून घ्या इत्यंभूत माहिती!
तुम्हाला कदाचित माहिती नसले म्हणून सांगतो की १२ ते ३६ महिने वयाच्या बाळांना पाण्याची सर्वाधिक आवश्यकता असते. मेंदू आणि स्नायू यांनी ठीक काम करणे यासाठी सुद्धा पाण्याची नितांत आवश्यकता असते. अनेकदा बाळाला पाण्या ऐवजी फ्ल्युड पदार्थ दिले जातात. असे म्हणतात की हे पदार्थ बाळाला अधिक ताकद देतात. पण हे चूक आहे.
जर डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तरच बाळाला असे पदार्थ पाजावे. पण कोणताच पदार्थ हा पाण्याइतका प्रभावी ठरू शकत नाही. म्हणून बाळाला पाणीच जास्त पाजावे. पण पालकांना माहित नसते की कोणत्या वयात बाळाला किती पाण्याची गरज असते. आज हिच गोष्ट आम्ही या लेखातून सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
बाळाला किती पाणी पाजावे
बाळाच्या शारीरिक वाढीसाठी पाणी खूप गरजेचे असते., म्हणून तुम्ही लहानपणापासून बाळाला हळूहळू पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. १ वर्षे ते ३ वर्षे वयाच्या बाळाला दिवसातून किमान 5 ते 6 कप पाणी पाजत राहायला हवं. ऋतूनुसार सुद्धा बाळाच्या शरीराला असणारी पाण्याची गरज बदलत राहते. उन्हाळ्यात बाळाला अधिकाधिक पाण्याची गरज असते कारण या काळात डिहायड्रेशन होऊ शकते आणि बाळाला जास्त थकवा जाणवत असतो. म्हणून उन्हाळ्यात बाळाला जास्तीत जास्त पाणी पाजत राहावे. पाणी जरी जास्त पाजले गेले तरी ते कधीच धोकादायक नसते हे लक्षात घ्या.
जास्त पाण्याची गरज का असते?
जर तुमचं बाळ खूप मस्तीखोर आहे किंवा खूप शारीरिक हालचाल करतं तर त्याच्या शरीराला अधिक पाण्याची गरज भासू शकते. कारण जास्त शारीरिक हालचाल केल्याने त्याचे शरीर जास्त उर्जेचा वापर करते आणि कमी झालेल्या उर्जेला भरून काढण्यासाठी आणि सतत हाइड्रेट राहण्यासाठी त्याच्या शरीराला खूप पाणी लागते. बाळ आजारी पडल्यास सुद्धा त्याला जास्तीत जास्त पाणी पाजत राहावे. सर्दी, ताप व अतिसार झाल्यास शरीरातून मोठ्या प्रमाणावर पाणी कमी होत असते म्हणून या काळातही बाळाला जास्तीत जास्त पाणी पाजा.
वयानुसार किती पाणी पाजावे
वयानुसार सुद्धा बाळाला पाणी पाजावे जेणेकरून त्या त्या वयात तो जास्त सुदृढ राहील. 6 ते 12 महिने वयाच्या बाळाला दिवसभारत एक किंवा दीड कप पाणी, 12 ते २४ महिने वायच्या बाळाला दिवसभारत एक ते चार कप पाणी आणि 2 ते 5 वर्षे वयाच्या बाळाला एक ते पाच कप पाणी पाजावे. या प्रमाणात त्या त्या वयात बाळाला पाणी पाजल्यास त्याची पाण्याची कमतरता भरून निघत जाते आणि बाळ तंदुरुस्त राहते.
पाण्याशिवाय बाळाला अजून काय द्यावे
पाण्याशिवाय असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही बाळाला देऊ शकता, हे पदार्थ त्याच्या शरीरातील पाण्याची मात्रा संतुलित राखतीलच पण सोबत त्याच्या तोंडाची चव सुद्धा भागवतील. फळांचा ताजा ज्यूस हा या बाबतीत अधिक उपयुक्त ठरतो. पण हे ज्यूस घरगुतीच असावे. मार्केट मधील बंद पाकीटातले ज्यूस बाळाला देऊ नयेत. तुम्ही बाळाला सूप सुद्धा देऊ शकता. सूप हे त्याच्या शरीरात अधिक पौष्टिकता निर्माण करेल. या व्यतिरिक्त दही, दुध, ताक सुद्धा योग्य वयात बाळाला भरवण्यास हरकत नाही.
पाणी पाजण्याची पद्धत
बाळाला थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजत राहावे. एकदाच खूप पाणी पाजण्याची चूक करू नये. सिरप कप मधून पाणी प्यायला लहान मुलांना आवडतं म्हणून त्याचा वापर करूनच बाळाला पाणी द्यावे. बाळाला जास्त गोड आणि साखर असलेले ज्यूस वा ड्रिंक देऊ नये. याशिवाय बाहेरील केमिकलयुक्त ज्यूस सुद्धा पाजू नये. यामुळे त्याच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तर या काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा आणि सुदृढ आरोग्यासाठी बाळाला पाणी पाजत राहा.
--------------------------- | --------------------------- |